Thursday, March 4, 2010

चित्रविचारांचा मागोवा.- मनु पारेख

पद्मश्री मनु पारेख यांच्या चित्रांचं प्रदर्शन वरळीच्या ताओ आर्ट गॅलेरीत चालू आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या चित्रांबद्दल व चित्रविचारांबद्दल जाणून घेऊयात...

भारतात ज्या काही थोडक्याच चित्रकारांना 'पद्मश्री'ने सम्मानित करण्यात आलं आहे, त्यात मनु पारेख यांचाही समावेश आहे. (माझ्या माहीतीप्रमाणे असे चित्रकार ४ पेक्षा जास्त नसतील.) मनु पारेख म्हणजे गेल्या पन्नास वर्षांपासून स्वत:ला चित्रात वाहून घेतलेले एक सिनीयर चित्रकार. एका चित्रकाराची अवांतर ओळख यापेक्षा जास्त असू शकत नाही.

असा आकारला चित्रकार
जेजेमधून १९५८ मधून बाहेर पडताना शंकर पळशीकरांसारख्या शिक्षकाचं मार्गदर्शन मिळालं. (आजही ते पळशीकर सरांबद्दल तेवढ्याच आत्मियतेने बोलतात.) काही काळ नाटकांमधून कामं केली. विवर्स सवीर्स असोशिएशनमध्ये डिजाइन कन्सल्टंट म्हणून काम केलं. कलकत्त्याला (आताचं कोलकाता) असताना कन्टेम्पररी चित्रकारांच्या सोसायटीचे सदस्य झाले. भारतातल्या वेगवेगळ्या भागात भेटी देत असतानाच इथल्या मातीतल्या रंगांनी, आकारांनी पारेख यांच्यातला चित्रकार अधिक चांगला घडत गेला. बाहेरगावी प्रवास करताना इथल्या चित्रपरंपरेतला वेगळेपणा आणखी प्रकर्षाने जाणवू लागला.

मनु पारेखीय चित्रं
भारतातल्या मातीत असलेल्या भडक (व्हायब्रंट) रंगाची ओढ त्यांच्या चित्रांमध्ये स्पष्ट दिसते. पारेख यांना चित्र काढताना पॅलेटच वापरावी लागत नाही. चित्रातला आणि चित्राबरोबरचा जो काही संवाद आहे तो कॅनव्हासवरच घडतो. जे आहे ते 'केवळ' जगणं... कुठल्याही पूर्व रुपरेषा ठरवून होईल ते चित्र कसलं?

चित्रकारासाठी चित्र काढणं म्हणजेच 'चित्रसेवा' आहे. नाम घेणं, पुजा करणं यात जी सहजता आहे, आत्मियता आहे, एकाग्रता आहे तीच चित्रनिमिर्तीच्या प्रक्रियेत असते. आणि ही प्रक्रिया सतत कायम चालू असते.

गेल्या तीन-चार वर्षांपासून जाणून बुजून आणलेला त्यांच्या चित्रांमधला बदल आताच्या त्यांच्या सिरीजमध्ये स्पष्ट दिसतो. लँडस्केपच्या आकारांच्या विश्वातून बाहेर येऊन त्यांनी केलेला फुलांचा अभ्यास. फुलांच्या आकारांबरोबरच काही लैंगिक आकारही त्यांच्या चित्रांमध्ये अगदी सहज येतात. मुख्य म्हणजे ते फॉर्मही फुलांच्या फॉर्म एवढेच निरागस असतात... सोफिस्टीकेशनच्या चाकोरीतलं चित्रं उगाच कृत्रिमता आणतं. जे वाटतंय ते स्पष्ट, प्रकट असावं असा प्रयत्न पारेख यांच्या चित्रांमधून नेहमीच दिसत आलाय आणि तो याही चित्रांमधून दिसतोय.

सहजता, रंग, आकार हा पारेख यांच्या चित्राचा श्वासच. त्यांच्या अशा बऱ्याच घडामोडींमधून निर्माण झालेल्या त्यांच्या चित्राचा प्रवास त्यांच्या गप्पांमधून पाहण्याची संधी आपल्याला मिळतेय. ६नोव्हेंबरला त्यांच्यावर केलेली डॉक्युमेंट्री ताओमध्ये दाखवली जाणार आहे.

सतत चेंजसाठी (Change) तयार असलेले पारेख लवकरच पुढच्या काळात काही नवीन कल्पना घेऊन येणार आहेत, याची नोंदही त्यांनी स्वत:ने करून दिली.

पारेख यांचा आताचा 'The Pursuit of Intensity' हा शो आपल्याला पाहायला नक्कीच आवडेल. प्रदर्शन १४ नोव्हेंबरपर्यंत चालू आहे.

ताओ आर्ट गॅलेरी, द व्यु, १६५ अॅनी बेझंट रोड, मुंबई - ४०००१८

(हाजी अलीच्या बसस्टॉपच्या जवळ असलेल्या पेट्रोलपंपाशेजारी)

- श्रीनिवास रणसुभे

'रिप्रेझेंटेशनल'वाद-विवाद

पुण्यामध्ये १० तारखेपासून रवि परांजपेंच्या पंच्याहत्तरीनिमित्त एक चित्रप्रदर्शन व गप्पांचा कार्यक्रम बालगंधर्वमध्ये साजरा होतोय. त्यानिमित्ताने रिप्रेझेंटेशनल व नॉनरिप्रेझेंटेशनल चित्र यावरच्या वादावर टाकलेला हा प्रकाशझोत...


एखाद्या स्पर्शातून, गंधातून, दृष्यातून, आवाजातून एखादा विचार सुचतो आणि तो विचार कलाकार आपल्या कलाकृतीतून मांडतो. हे सुत्र सर्वच कलांमध्ये सारखंच आहे. अगदी पाचही ललितकला या एका धाग्याने घट्ट बांधलेल्या आहेत. मात्र आपले विचार मांडण्याची माध्यमे जेव्हा बदलली तेव्हा त्या सर्वांमध्ये फरक झाला.

चित्रकलेत यातही पुढे रिप्रेझंेटेशनल आणि नॉनरिप्रेझंेटेशनल अशी एक महत्त्वाची जातकुळी निर्माण झाली. हा महत्त्वाचा फरक आला तो दोन्ही प्रकारच्या चित्रांच्या मांडणीतल्या चित्रकांरांच्या अट्टहासामुळे... रिप्रेझंेटेशनल चित्रकारांचा हट्ट असा, की त्यांच्या चित्रातील एलिमंेटस हे दर्शकांना कळतील असेच (प्रतिकात्मक) असतील. त्यामुळे ही चित्रकला फार लोकाभिमुख झाली.(?) तर नॉनरिप्रेझंेटेशनल चित्रपरंपरेतील चित्रकारांनी चित्रातून जास्तीतजास्त 'अंतर्मुख' होण्याचा प्रयत्न कायम ठेवला. (जगणं आणि चित्र काढणं हे वेगळं नसतंच.) पण ज्यांना हे समजलंच नाही, असे पासरीने खोटे अमूर्त चित्रकार निर्माण झाले. तर या दोन्ही दगडांवर पाय ठेऊ पाहणारे, 'मधले' 'माकेर्ट' च्या दृष्टीने चित्र काढणारे चोर चित्रकार निर्माण झाले... सेलिब्रीटीज निर्माण झाले. आता मात्र डेकोरशन आर्ट व केवल-चित्र असं शीतयुद्ध कायम चालूच आहे. हा झाला चित्रकलेतला इतिहास आणि वर्तमान.

ही सर्व पार्श्वभूमी देण्याचं कारण म्हणजे पुण्यामध्ये रवि परांजपंेच्या पंच्याहत्तरीनिमित्त आपल्या सर्वांच्या भेटीसाठी एक चित्रप्रदर्शन व गप्पांचा कार्यक्रम बालगंधर्वमध्ये साजरा होतोय. इलस्ट्रेशन व आकीर्टेक्टससाठी लागणारी मांडणीचित्र, अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी 'रवि परांजपे शैली' असा ठसा उमटवला. पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ ते चित्रकला क्षेत्रात कार्यरत आहेत. 'शिखरे रंग रेषांची' आणि 'ब्रश मायलेज' या पुस्तकांमुळेही ते आपल्याला माहीत आहेत. रवि परांजपे अमृतमहोत्सव समितीद्वारे होणा-या ह्या तीन दिवसांच्या कार्यक्रमात रवि परांजपंेशी ड्रॉइंग, इलस्ट्रेशन, सौंदर्यदृष्टी, डिझाइन बेस कल्चर अशा विषयांवर संवाद साधला जाणार आहे. १९९१ मध्ये पुण्यात झालेल्या त्यांच्या व एस एम पंडीत यांच्या प्रदर्शनाने विक्रमी प्रतिसाद मिळवला होता. अगदी लांबच्या लांब रांगा लावून लोकांनी हे प्रदर्शन पाहीलं होतं.

या प्रदर्शनाच्या निमित्ताने रवि परांजपंेशी बोलताना, भारतीय परंपरेत अलंकरण हा रोजच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता. तो आता खूपच कमी होत चालला असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. चित्रनिमिर्तीच्या परंपरेत निरागसतेला खूपच महत्त्व असतं. पण 'रिप्रेझंेटेशनल चित्रनिमितीर्त निरागसतेपेक्षा संस्कार अधिक महत्त्वाचे आहेत. एखाद्या लहान मुलाने काढलेल्या चित्राला संस्काराचं कांेदण असेल तर ते अधिक चांगलं असेल.' असेही परांजपे म्हणाले.

या कार्यक्रमाच्या कॅटलॉगध्ये आपले विचार मांडताना परांजपंेनी नॉनरिप्रेझंेटेशनल चित्रशैलीविरोधात तलवारच उपसली आहे. ते आपल्या लेखात अशा चित्रांना अपरंपरावादी, कुरूप चित्रे म्हणतात. तसंच त्यांच्या या चित्रप्रदर्शनाबद्दल ते म्हणतात की हे प्रदर्शन म्हणजे या काळच्या चित्रांमध्ये ओअॅसिससारखे आहे. याच अमूर्त चित्रांबद्दल विचार मांडताना ते म्हणतात की, 'राग साथीला न घेता ख्याल गायल्यासारखा वाटतो, अशी ही चित्रकला आहे. अर्थात ही अमूर्त चित्रशैली पूर्ण टाकाऊ आहे असं नाही.' असं म्हणताना सॅम फ्रांसीस, रामकुमार यांच्या चित्रांबद्दलचा आदर त्यांनी बोलून दाखवला.

परंपरेतला हा वाद असाच चालू राहील. एका लेखाने, एका प्रदर्शनाने तो मिटणार नाही. किंवा यातून खूप काही लोकशिक्षण होणार नाही. सरते शेवटी एवढंच म्हणावंस वाटतं...

रचना (Design) व कला (Art) यात बराच फरक आहे. नाहीतर हे वेगळे शब्दसुद्धा निर्माण झाले नसते. यातला नेमका अर्थ कळण्यासाठी वेगळं विचारमंथन होण्याची गरज आहे. ज्यांना याचा नेमका फरक कळला ते 'चित्र जगण्याकडे' वळले. बाकीच्यांनी या गतेर्तून बाहेर यावं की येऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

।। सत्यचित्रार्पणमस्तु।।

- श्रीनिवास रणसुभे

तरूण चित्रकारांचा 'आकार'

हल्लीच्या चित्रांबद्दल काहीही कळत नाही... खूप काही गूढवाद असलेली चित्रं असतात... नुसताच रंगांचा पसारा असतो... आताच कॉलेज संपलं आणि काहीतरी रंगवून ठेवलंय... असं क्रीटीसिजम चित्रांबाबत व नवीन चित्रकारांबद्दल होत राहतं.

पण कधीकधी खरंच त्या नवीन चित्रकारांची सुरूवातीची भरारी त्यांच्या आकाशाची व्याप्ती दाखवते. असं लिहीण्यामागंचं कारण म्हणजे आताच जहांगिरमध्ये चालू असलेलं काही तरूण चित्रकारांचं चित्रप्रदर्शन...

उमेश पाटील, नागेश घोडके, योगेश पाटील या रहेजा स्कुल ऑफ आर्टमधून मागच्याच वषीर् बाहेर पडलेल्या तरूण चित्रकारांचं 'आकार' हे चित्रप्रदर्शन त्यांना उमगलेल्या अवकाशाची जाणीव करून देते.

उमेश आपल्या चित्राबद्दल म्हणतो की 'आपण आपले भाव प्रकट करण्यासाठी शब्द वापरतो पण आकार व्यक्त करण्यासाठी आपल्याला आकारांचाच आधार घ्यावा लागतो. त्यासाठी अगदी प्रायमरी कलर्स वापरून तो आपलं अवकाश जगतो व तेच तो रंगवतो...'

नागेश मुळचा लातूरचा. 'आपल्या आजूबाजूच्या जगात ज्या गोष्टी रंगामुळे, आकारांमुळे आपलं लक्ष वेधून घेतात त्या आपल्या मनात सबकॉन्शसली घर करून राहतात. त्यांना आपल्या चित्रात सहज येऊ देणं हाच माझ्या चित्राचा उगम.' असं तो म्हणतो.

उमेशच्या चित्रातसुद्धा त्याच्या अक्षरांवरून त्याला चित्र कसं स्फुरलं? ते तो सांगतो. पूवीर् बॅनर बनवताना कळलेली निगेटीव्ह स्पेस तो आता त्याच्या चित्रात जगतो.

या तरूणांना आपलं काम खूप पुढे घेऊन जायचं आहे. जर पुढचा सर्व काळ एक कॅनव्हास म्हटला तर आताशी कुठे त्यांनी फक्त ब्रश टेकवला आहे. त्यांनी त्यांचं काम असंच चालू ठेवावं. या तरूण चित्रकारांचं योग्य ते कौतुक करण्यासाठी आपण हे प्रदर्शन जरूर पाहावं.

प्रदर्शन आपल्याला १४ ते २० सप्टेंबर २००९ या काळात सकाळी ११ ते संध्या ७ या वेळेत पाहता येईल.

स्थळ: जहांगिर आर्ट गॅलेरी, एसी-२, काळा घोडा, मुंबई-२३

- श्रीनिवास रणसुभे

निसर्ग रमलाय चित्रात...

मंगल पाडेकर यांच्या चित्रांचं प्रदर्शन सोमवार पासून जहांगिर आर्ट गॅलेरी येथे सुरू होत आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या चित्रांबाबत व मिडीअम बाबत काही चर्चा...
..........

ऋतु हिरवा ऋतु बरवा...

पाचूचा वनि रुजवा...

पावसाळा संपताना येणारा हिरवाकंच बहर आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. मग तो चित्रातला विषय असला तर क्या कहने...

याच सुमारास आपल्या सर्वांच्या भेटीला येतंय एक चित्रप्रदर्शन, ज्याचा विषयच मुळात 'ब्लॉसम' आहे. मंगल पाडेकर यांचं चित्रप्रदर्शन जहांगिर आर्ट गॅलेरी येथे सुरू होत आहे.

या चित्रप्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे चित्राचं माध्यम... कापडाचं कोलाज. (अर्थात या आधीही या मिडीअममध्ये बरेच प्रयोग झालेत यात वादच नाही.) रंगवलेलं कापड एकमेकांवर चिकटवून, काही ठिकाणी एम्बॉस करून चित्ररचना सुबक केलेली आहे. मात्र कामातील सफाईदारपणा व रंगांचा खेळ तसंच कापडाचा वापरलेला पोत व त्याचा पारदर्शकपणा, हा काही वेळेला हे चित्रं पाहणाऱ्याला नक्कीच गोंधळात पाडू शकतो यात शंका नाही.

चित्रांच्या विषयाबद्दल विचारले असता मंगल पाडेकर म्हणतात...

'आजच्या जगात निसर्गाबद्दलची जवळीक कमी होऊ लागली आहे. पूवीर् बरीच झाडं रस्त्याने जाता-येता दिसायची. आजूबाजूला असायची. पण आजच्या 'फास्ट' जगात आपल्या शेजारच्या दूर्वा (ज्याला आपण फक्त गवत म्हणतो ते) बघायची दृष्टीसुद्धा आपण गमावत चाललो आहे, ती संवेदना संपवत चाललो आहे, त्यांची खंत वाटते.' मंगल पाडेकर मुळच्या मुंबईतल्याच, इथलंच शिक्षण, राहणीमान. पण जो निसर्ग त्यांना घरातल्या कुंडीत दिसला आणि नवऱ्याबरोबरच्या गप्पांमधून जाणवला, जवळ आला त्याच्याशी त्यांची गट्टी जमली आणि त्यांनी ती चित्रांत मांडली.

आपली चित्रं पाहणाऱ्यांना सहज समजावीत. त्यातून त्यांना आनंद मिळावा, हा मुख्य हेतू समोर ठेवूनच आपल्या चित्रांची मांडणी व आकार मंगल पाडेकर ठरवतात. त्यांच्या चित्रातील आकार बरेच रिप्रेंझेंटेशनल असले तरीही काही ठिकाणी त्यांनी स्वातंत्र्य घेऊन चित्र अधिक पेंटरली करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

वास्तवात 'पाडेकर' म्हटलं की लगेच काही 'चित्राकार' आपल्या समोर येतात. पण मंगल पाडेकरांनी मात्र आपली छाप नक्कीच काहीशी वेगळी पाडली आहे. त्यासाठी त्यांनी निवडलेलं मिडीअम असो किंवा चित्रातील सहज आकार असोत हे नक्कीच कारणीभूत आहेत.

सर्वच चित्रं ही 'ब्लॉसम' या थिमशी संबंधित असल्याने ती गोंडस, स्वप्नील अशीच आहेत. चित्रातले आकार, रंग हेही तसेच जाणवतील. वास्तवातल्या जगात माणसाला हा गोंडस - गुलाबीपणा थोडा आनंद देतील असा विचार करून चित्रकतीर्ने चित्रांची मांडणी अशी केली आहे. मात्र ही चित्रं केवळ डोळ्यांना दिसणाऱ्या निसर्गाच्या मांडणीपर्यंतच येऊन थांबतात असं नक्कीच म्हणावसं वाटतं. असो.

प्रदर्शनात मिडीअमचा वापर पाहून थोडंसं 'बुचक्कळ्यातंच पडायला' आपल्या सर्वांना नक्कीच आवडेल. हे प्रर्दशन आपल्याला जहांगिरमध्ये १४ ते २० सप्टेंबर या काळात स.११ ते संध्या. ७ या वेळेत पाहता येईल.

जहांगिर आर्ट गॅलेरी, काळा घोडा, फोर्ट

- श्रीनिवास रणसुभे

प्रोडक्ट की शिल्प

आजवरच्या चित्रकलेतल्या वेगवेगळ्या मिडीअम्सवर नजर टाकायची म्हटली तर अगदी दगड, माती, शेण, गवत असे शेकडो मिडीअम्स समोर येतात. तर शिल्पांसाठीसुद्धा अशीच शेकडो माध्यमे वापरली गेली आहेत. ३१ जुलैला संपलेल्या स्वाती साळगांवकर आणि स्मिता खन्ना यांच्या शोमध्ये अशाच एका वेगळ्या प्रकारच्या मिडीअममध्ये काम केलेले दिसले... 'पॉलिएस्टर रेझीन'. त्याच अनुषंगाने घेतलेला हा आढावा.
......

कला निमीर्ती आणि मिडीअम्स
अशी कोणतीही गोष्ट माणसाच्या आजूबाजूला नाही जी कलाकरांनी यापूवीर् कलानिमीर्तीसाठी वापरली नाही. अगदी दगड, माती ते माणसा - प्राण्यांच्या हाडा मांसापासून केसांपर्यत सगळं...

आधूनिक चित्रकलेत पिकासो एक असा चित्रकार आहे ज्याने सुरुवातीला केवळ कॅनव्हास, रंग अशा मिडीअम्सना चिकटून न राहता वेगवेगळ्या माध्यमातून चित्रनिमीर्तीला सुरूवात केली आणि लोकांची तशी दृष्टी बदलवली...

भारतातच कंटेंपररी आर्ट मिडीअम्समध्ये प्लास्टीक, ग्रीस, ग्लिसरीन, फायबर ग्लास, काँक्रीट यासारख्या वस्तुंंची नोंद आढळते. एवढ्यावरच न थांबता कलाकारांनी फोटो, व्हिडीओ, इंटरनेट सारखे डिजीटल मिडीअम्सदेखील वापरलेले दिसतात.

अशाच एका मिडीअमच्या प्रयोगाविषयी आपण जाणून घेऊयात...

प्रदर्शनाविषयी...
'NOTE: nature of the experiment' या शीर्षकाने झालेल्या या प्रदर्शनात स्मिता खन्ना, स्वाती साळगांवकर या 'आकिर्टेक्ट्स'नी केलेल्या काही फनिर्चरवजा 'वस्तू' मांडलेल्या दिसल्या. २७ ते ३१ जुलै या दिवसात काळा घोडा येथील ICIA Institute Of Contemporary Indian Artयेथे झालेल्या या प्रदर्शनाला बऱ्याच मोठमोठ्या हस्तींने भेट देऊन प्रशंसा केली. यात सतीश शहा, हर्ष गोएंका, कालनिर्णयकार जयंत साळगांवकर इ. सारख्यांचा समावेश आहे.

प्रथम या दोन होतकरू आकिर्टेक्टविषयी जाणून घेण्यासारखे विशेष म्हणजे... स्मिताने आकिर्टेक्चरल असोसिएशन-लंडन इथून, तर स्वातीने येल युनिव्हसीर्टी-अमेरिका इथून आपलं शिक्षण हल्लीच पूर्ण केलं आहे.

मिडीअमविषयी...
या प्रदर्शनात या दोघींनी पॉलिएस्टर रेझीन या मिडीअमबरोबर कापड, पाने, बीया अशा काही नैसगिर्क पदार्थांचा वापर केला होता. केवळ माध्यमाचा अभ्यास म्हणून वेगवेगळे प्रयोग करून पाहीले होते. पॉलिएस्टर रेझीन हे मिडीअम इंटेरिअरच्या कामात दरवाजा, कपाट यांच्या सुशोभिकरणासाठी बऱ्याच प्रमाणात वापरले जाते. बफींग केल्यावर ते काचेसारखे पूर्ण पारदर्शक होते. सौंदर्यासोबतच या मिडीअमच्या सर्व शक्यता अतिशय उत्तमपणेे अभ्यासलेल्या दिसल्या.

प्रोडक्ट की शिल्प
संपूर्ण शो हा एखादा फनिर्चर शो वाटला असला, तरी प्रदर्शनातील 'वस्तू' या खूपच कलात्मक होत्या. त्यांना एक कलाकृती म्हणून देखील दर्जा होता. पण स्वाती व स्मिता यांना 'या वस्तू तुम्ही वर्क ऑफ आर्ट म्हणून तयार केल्या आहेत का?' असा प्रश्न विचारल्यावर मात्र त्या गोंधळलेल्या दिसल्या... तसा त्यांचा प्रयत्न हा फनिर्चरपर्यंतच असलेला जाणवला. दिवसेंदिवस जसजशी स्मिता व स्वाती यांची प्रगल्भता वाढत जाईल तसा हा गोंधळ कमी होईल आणि कलानिमीर्ती व प्रोडक्ट डिजाइन (art & design) यातील मेख समजून येईल.

त्यामुळे एक फनिर्चर शो एका आर्ट गॅलेरीत चालू आहे असाच एखाद्याचा समज झाला असल्यास त्यात गैर काही नाही.

एखादी कल्पक कलाकृती ही कलाशिक्षण झालेल्या कलाकारानेच निर्माण करावी असा काही नियम नाही. आपल्या घरातील एखादं लहान मुल देखील ते करू शकतं. तसंच डॉक्टर, आकिर्टेक्चर, इंजिनीअरींग असं वेगवेगळं शिक्षण पूर्ण करून कलानिमिर्ती करणारे कलाकार या जगाला माहीत आहेत. अशा कलाकारांच्या कलांनी इतिहासदेखील घडवला आहे.

मुळातच कल्पक असलेल्या कलाकारांना आपल्या भावना प्रगट करण्यासाठी मिडीअमसारख्या 'क्षुल्लक' गोष्टींची कधीच अडसर आलेला नाही आणि येणारही नाही. त्यांच्यातला निसर्ग कल्पकतेने असाच बहरत राहील...

- श्रीनिवास रणसुभे

निसर्गाच्या गप्पा - पांडूंरंग ताठे

आजूबाजूच्या जगाचा कलाकाराच्या चिंतनावर परिणाम होत असतो. कधी ते संस्कार कलाकाराकडून जपले जातात, तर कधी ते मरतात. एखादी झाडाची बी जमिनीत रुजावी तसे ते रुजतात. पण ते निष्काळजी हाताळल्याने त्यांची पुरती विल्हेवाट लागते.

बरवे इतक्या वर्षाच्या प्रॅक्टीसनंतरसुद्धा म्हणायचे की त्यांचं चित्रं एखाद्या दहिहंडीसारखं वरवर वाढत जातं. पूर्ण होता होता त्याचा बॅलेंस सांभाळणं हे अधिकाधिक कठिण होतं.

असं २० वर्षापेक्षा जास्त कामाचा अनुभव असलेले पांडूरंग ताठे यांचं प्रदर्शन सध्या जहांगीर आर्ट गॅलेरीत चालू झालंय. 'साधारण ८६ साली बेंदेंच्या बरोबर झालेल्या गप्पांतून त्यांचं चित्रं अधिकच फुललं. ते अधिक नेमकं होतं गेलं... दिसतंय तसं करण्यापेक्षा, जसं फिल होतंय तसं चित्रं काढणं चालू झालं.' 'पुढे बरवेंच्या गप्पांतून विचारांना अजून स्पष्टता आली.' असंही ते म्हणतात. 'पांढऱ्या रंगातून शांती, आध्यात्मिकता असं काही प्रतित होतं, असं मला काही वाटत नाही.' अशा भंपक गोष्टींबद्दल परखड भूमिकाही ते मांडतात. 'जे मला वाटतं ते मी करतो...' इति पांडूरंग ताठे....

निसर्ग आजूबाजूचा, आतला, बाहेरचा हाच त्यांच्या चित्रांचा आशय. २० वर्ष पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात कलाध्यापक म्हणून काम करणारे ताठे सर कामात 'चित्रकार' म्हणून पूर्ण वेगळे दिसतात.

त्यांचं चित्रप्रदर्शन आपल्याला २१ तारखेपर्यंत काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलेरीतल्या तिसऱ्या एसी गॅलेरीत स. ११ ते सायं. ७ या वेळेत पाहता येईल.

- श्रीनिवास रणसुभे

चित्रातून झणझणीत भाष्य - वलय शेंडे

कोणतीही कला ही कलाकाराच्या आजूबाजूची नैसगिर्क, सामजिक, राजकीय, आथिर्क परिस्थिती यांचं प्रतिबिंब असतं. त्याचं प्रगटीकरण हे वेगवेगळा कलाकार वेगवेगळ्या पद्धतीने करतो.

माणूस हाच कलाकृतीच्या कंेदस्थानी ठेऊन काम करणाऱ्या वलय शंेडेने मागच्या शोमध्ये माणसाचं दु:ख आणि मृत्यु या संकल्पनेवर आधारीत काम केलेलं होतं. तर आताच्या प्रदर्शनात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मुंबईतला डबेवाला, म्हैस आणि आजच्या जगातील धामिर्क परंपरांचं अंधानुकरण या विषयांवर तो प्रकट भाष्य करताना दिसतो.

'शेतकरी आत्महत्या' या त्याच्या शिल्पाबद्दल बोलायचं झालं तर...

सुंदर राजेशाही डायनिंग टेबलवर ठेवलेल्या दोन मसाल्याच्या डब्या आणि टेबलला शोभतील अशा ८ खुर्च्यांचा सेट एवढंच दिसतं. पण संकल्पनेबद्दल विचार कराल तर... या राजेशाही टेबलवर बसून जेवणाऱ्या लोकांच्या अन्नासाठी खपणारा शेतकरी हा, पुरेशा मुलभूत गरजा उपलब्ध नसल्याने आत्महत्या करतोय... आणि त्याच्या अंत्यविधीनंतरची राख आता त्याच टेबलवर असणाऱ्या डबीमध्ये भरून ठेवली आहे... (ही राख खरंच विदर्भातल्या एका आत्महत्या केलेल्या नरसिंगलू या शेतकऱ्याच्या जळणातली आहे. घटनेनंतर वलयने ती वापरली आहे.)

''धर्माचं केवळ अंधानुकरण करून मानवजातीचा विकास कधीच होणार नाही. तसंच नास्तिकपणा हा काही यावरचा उपाय असू शकत नाही. तर काही लोकोपयोगी तत्व माणसानी जपायला हवीत,तरच समाज प्रगत होईल.'' या त्याच्या भूमिकेवरून त्याच्या चित्रांतील प्रेरणेचा आडाखा बांधता येतो.

हे आणि यासारखे आणखी काही धक्के पचवायची तयारी असेल तर नक्कीच हे शिल्प प्रदर्शन पाहायला साक्षी आर्ट गॅलेरीपर्यंत जायला हवं.

ते आपल्याला १२ तारखेपर्यंत पाहता येईल.

साक्षी आर्ट गॅलरी, टन्ना हाऊस, ११ए, नाथालाल पारेख मार्ग, कुलाबा.

- श्रीनिवास रणसुभे

जगभरातील स्कुल्स मुंबईच्या दरबारी

२०व्या शतकातील ब्रिटीश चित्रकारांच्या चित्रांचा मुळ हेतू होता तो म्हणजे प्रत्येक गोष्टीचं डॉक्युमेंटेशन करणं आणि ते ब्रिटनच्या राणीसमोर सादर करणं. त्याचा दस्तावेज म्हणून उपयोग काही प्रशासकीय निर्णय घेण्यासाठी व्हायचा. हा काळ होता जेव्हा अजून कॅमेराचा शोध लागला नव्हता. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही अधिक बारकाईने मांडली जायची. (आपल्या म्युझियममध्ये अशी बरीच चित्रं पाहता येतील.) पुढे कॅमेराचा शोध लागलाच, तसंच चित्रकारांचा कल हा जसं दिसतं तसं काढण्याकडून जे अंतर्मनाला फिल होतं ते काढण्याकडे वाढू लागला.

वर्षा आणि दिनेश ठक्कर यांच्या कलेक्शन मधील काही चित्रांच्या 'अराउंड द र्वल्ड' या प्रदर्शनामुळे परत एकदा १९ आणि २०व्या शतकातील चित्रकारांची चित्रं पाहण्याचा योग आपल्याला आला आहे. प्रदर्शनामागची भुमिका मांडताना ठक्कर म्हणतात, 'जगभरातून चित्रकलेत काय काय झालंय त्याचं एकत्रित स्वरूप इथल्या भारतातल्या लोकांना पाहायला मिळणं हाच हेतू.'

दिनेश ठक्करांबद्दल मागे खोट्या चित्रांची झोड उठली होती. त्याबद्दल त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं की, 'जर मला एखादं चित्रं खोटं वाटत असेल तर मी त्याला हातसुद्धा लावत नाही. त्याबद्दल कोणाला आणखी काही बालंट उठवायचं असेल तर आय डोन्ट बॉदर...' असो...

प्रदर्शनात सगळंच काही खोटं असू शकत नाही. ते नक्कीच पाहण्याजोगं आहे.

०७ एप्रिलपर्यंत १० ते ०७ या वेळेत ते कुमारस्वामी हॉल, छत्रपति शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय (पूवीर्चं प्रिंस ऑफ वेल्स म्युझियम)महात्मा गांधी रोड, मंुबई - ०१, येथे सर्वांसाठी मोफत खुले आहे.

- श्रीनिवास रणसुभे

प्रदर्शन असेही, प्रदर्शन तसेही

या आठवड्यात पाहण्यासाठी दोन महत्त्वाची प्रदर्शनं म्हणजे जेजे स्कुल ऑफ आर्ट येथे लागलेलं ४९वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (प्रोफेशनल कॅटेगरी) आणि दुसरं नेहरू सेंटर मधला ग्रुप शो.

जेजे मधलं प्रदर्शन एकतर चुकून इथे लावलं गेलंय किंवा सरकारचं पुन्हा एकदा या राज्य प्रदर्शनाकडे (अंतिमत: कलेकडे) वाढत चाललेलं दुर्लक्ष दर्शवतंय. याबद्दल कितीही ओरड उठवून काहीही उपाय मात्र नाहीत. दरवषीर् जहांगिरसारख्या गॅलेरीत लागणारं प्रदर्शन कदाचित कॉस्ट कटींग म्हणून (गॅलेरीची तारीख रद्द करून) जेजेमध्ये लावलंय (अर्थातच चकटफू). आणि आपलं कलासंचानालय ते करून घेतंय. अशी गत आहे. असो. ते प्रदर्शन होतंय ते काही कमी नाही. शेवटी भावी 'मोठ्या' चित्रकारांना चित्र दाखवायला जागा मिळतेय ना... हे प्रदर्शन आपल्याला २९तारखेपर्यंत पाहता येईल.

तर दुसरीकडे अशा कुठल्याही सरकारी सपोर्टशिवाय काही तरूण चित्रकार आपलं काम नेहरू सेंटरमध्ये दाखवतायत. या चित्रांच्या विक्रीतून येणारा पैसा हे चित्रकार २६/११ ची झळ पोहोचलेल्या कुटुंबांना मदत म्हणून देणार आहेत. 'चित्र, इन्वेस्टमेंटचं एक माध्यम, एक घर सजवण्याची वस्तू असते. तसं ते व्यक्त होण्याचं ... तर कधी दु:खितांचे अश्रू पुसण्याचं माध्यम देखील असतं.' अशा निर्मळ भावनेने केलेला हा प्रयत्न नक्कीच दखल घेण्याजोगा आहे. मदत करता येवो ना येवो पण ही शाबासकीसाठी पाठ थोपटायला तरी हे प्रदर्शन नक्कीच पाहीलं गेलं पाहीजे. हे प्रदर्शन आपल्याला ३० तारखेपर्यंत नेहरू सेंटर आर्ट गॅलेरी (डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी) येथे पाहता येईल.

- श्रीनिवास रणसुभे

सी आर शेलार यांचं ऑनलाइन फोटोप्रदर्शन.

मूळ यवतमाळच्या सीआर शेलारे यांचं सध्या नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत त्यांच्या निसर्ग या विषयावर फोटोप्रदर्शन चालू आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या फोटोंचं ऑनलाइन फोटो प्रदर्शन फक्त महाराष्ट्र टाइम्स.कॉम वर.

गेली २५ वर्ष सातत्याने फोटोग्राफी करत असलेल्या सीआर यांचं पहिल्यांदाच मुंबईत प्रदर्शन होत आहे.

आजपर्यंत अनेक विषय सीआर यांनी हाताळले. ते विषय म्हणजे असे ज्यांनी सीआर यांच्या मनाला साद घातली. मग ते चंदपूरमधल्या कोळशाच्या खाणीतल्या मजूरांच्या समस्या असू देत, एमटीडीसीची प्रमोशन्स असू देत किंवा डेक्कन ओडीसीसाठी केलेलं कमिशन वर्क असू देत.

'लेन्सपेक्षा सेन्स महत्त्वाचा.' असा मुलत: विचार असलेल्या सीआर यांचा प्रयत्न कायम महाराष्ट्रातलं सर्व प्रकारचं सौंदर्य टिपण्याचा राहीला. त्यात मग माणसं, त्यांचे पेहराव, इथली जमीन, निसर्ग असं सगळं त्यांनी त्यांच्या कॅमेराने टिपलं.

आताचं प्रदर्शन म्हणजे मायक्रो वाइल्ड लाइफचं डॉक्युमेंटेशन म्हणता येईल. सामन्यत: जंगलात गेल्यावर केवळ जंगली श्वापदं पाहणं हाच अट्टाहास केला जातो आणि इतर सुक्ष्म जगाकडे दुर्लक्ष होतं. तर नेमक्याच मुद्द्यावर सीआर यांचे फोटो भाष्य करतात.

मात्र नेहरू सेंटर येथे त्यांचं प्रदर्शन जाऊन पाहणं हेच जास्त श्रेयस्कर ठरेल.

चित्रामध्ये चित्राबाहेर - वीर मुंशी

चित्रकारासाठी त्याची 'प्रेरणा' हीच त्याच्या चित्रनिमिर्तीतील महत्त्वाचं कारण असते. ती प्रेरणाच कोणतं माध्यम निवडावं, ते कसं वापरावं यासाठी प्रवृत्त करते. मग त्यानुसार चित्रकार रंग, ब्रश, पेपर, माती, मेटल, पाणी, झाड, पान, एवढंच नाही तर कॅमेरासुद्धा.... यापैकी कोणतं साधन निवडावं हे ठरवतो आणि त्याच्या प्रतिभेनुसार त्याची मांडणी करतो.

वीर मुंशी सगळ्या कला जगतात दिल्लीतले एक काश्मिरी चित्रकार म्हणून माहीत आहेत. तसेच त्यांचे चित्रातले मानवी आकार, एक्सप्रेशन, मल्टीमिडिया इन्स्टॉलेशन, संकल्पना यांमुळे देखील माहीत आहेत. किंबहूना जगभर हीच त्यांची ओळख आहे. मात्र जेव्हा त्यांची प्रेरणा त्यांना कॅमेरा वापरायला प्रवृत्त करते तेव्हा निर्माण होतं 'शार्पनेल' हे चित्रप्रदर्शन.

या प्रदर्शनाचा एक भाग म्हणजे... काश्मीरी पंडीतांच्या घरांचे असे काही फोटो ज्या 'वास्तू' म्हणून त्यांच्या अनुभवात खोल कुठेतरी अजूनही घर करून आहेत. क्लीक करताना कधी तुटून फडकत असलेली खिडकी त्यांना खुणावते तर कधी कागदासारखा चुरगळलेला घराचा पत्रा. कधी फाटक्या भिंतीतून दिसणारं आकाश प्रेरणा ठरतं तर कधी संपूर्ण तीन मजल्याच्या दगडी भितीचं घर.

आणि प्रदर्शनाचा दुसरा भाग म्हणजे 'द चेंबर' हे इन्स्टॉलेशन, जागतिक पातळीवर चाललेल्या दहशतीबद्दल वीर यांच्या अनुभूतीचं दर्शन. यांत चित्र केवळ पाहणं होत नाही, तर आपण त्या चेंबरमध्ये (चित्रामध्ये) त्या चित्राचा एक भाग होतो आणि त्याचा अनुभव घेतो.

हा अनुभव फक्त पेपरवर पाहण्यापेक्षा गॅलेरीत जाऊन घ्यावा असा आहे. तो आपल्याला ०४ एप्रिलपर्यंत ताओ आर्ट गॅलेरीत घेता येईल.

ताओ आर्ट गॅलेरी
द वीव्ह, १६५, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी. नेहरू तारांगण जवळ.

- श्रीनिवास रणसुभे

रंगवून रंगात साऱ्या....

रंग हा रेषा आणि आकार यांच्याबरोबरचा चित्रातला महत्त्वाचा घटक. चित्रात रंग असला अथवा नसला, तरी प्रकाशाचं अस्तित्व हे त्याची उणीव भरून काढतं. रंगाची निवड करताना चित्रकार 'त्याच्या पद्धतीने' काही मापदंड वापरत असतो.

शीला माखीजानी रंग-रेषांच्या माध्यामातून अवकाशाची (चित्राची) मांडणी करतात. त्यांच्या चित्रातल्या रेषा कधी एकमेकांना भेटतात, कधी भांडतात, कधी सहज उडून दुसरीकडे जातात, कधी दंगा करतात, कधी खेळतात... रेषांच्या सुटत आलेला गुंत्याप्रमाणे त्यांची चित्रं जाणवतात. ज्यांनी त्यांचं आधीचं काम पाहीलं आहेे, त्यांना त्यांच्या आताच्या कामांमध्ये थोडे रंग कमी दिसतील. पण या कामांमध्येसुद्धा रंग आणि रेषांच्या मांडणीतून 'केवल' सहजता स्पष्ट जाणवते. शीला माखीजानींची चित्रं आपल्याला २२मार्चपर्यत काळा घोडा येथील बोधी आर्ट गॅलेरीत पाहता येईल.

बोधी आर्ट गॅलेरी
के. दुभाष रोड, आय. टी. टी. एस. हाऊस, काळा घोडा, जहांगिर आर्ट गॅलेरी जवळ

- श्रीनिवास रणसुभे

निराकार आवाजाची मूर्त बांधणी - स्विटी जोशी

सध्या आपल्याला संथाना आणि गणेश गोहन, राधिका आणि निलेश कुमावत, प्रमोद कुमार, प्रताप मोदी आणि स्वीटी जोशी यांचा ग्रुप-शो पाहता येईल म्युझियम आर्ट गॅलेरीत. हे प्रदर्शन ८ तारखेपर्यंत चालू आहे.

संथानाच्या कामातली अॅब्स्ट्रॅक्ट मांडणी एखाद्या दृश्याच्या सारांशापर्यंत घेऊन जातेय असं वाटतं. तर आपल्याला कधी कबुतराच्या मानेवरचा रंग आवडतो. तो का आवडतो सांगता येत नाही. पण ते आवडणं त्या वेळेशी संबंधित असतं आणि त्या वेळेला ते रंगवताना शोधण्याचा प्रयत्न.... करणं ही चित्राची प्रोसेस असू शकते.

अस्तित्वाची तरलता असते ती तरलता शोधण्याचा प्रयत्न करतेय.

म्युझियम आर्ट गॅलेरी
के. दुभाष रोड, (जहांगिर आर्ट गॅलेरीजवळ) काळा घोडा, मुंबई.

- श्रीनिवास रणसुभे

मिलिंद जोशी - चित्रांमध्ये...

An art form is just a medium and an artist must have something to tell....

अशा प्रमुख भुमिकेतून कलेकडे पाहणाऱ्या मिलिंद जोशीचं प्रदर्शन सध्या ठाण्याच्या निताई गौरज या गॅलेरीत चालू आहे. होय मिलिंद आपल्याला संगीतकार, कवि, गायक म्हणून माहीत आहे, त्याचप्रमाणे तो चित्रकारदेखील आहे. (त्याचं अप्लाइड आर्टचं शिक्षण पुण्याच्या अभिनवमधून झालंय.) प्रदर्शनात मूर्त, अमूर्त, लँडस्केप अशा बऱ्याच प्रकारची कामं पाहायला मिळतील. प्रदर्शनाबद्दल मिलिंद म्हणतो की 'वेगवेगळ्या कलेमधले दुवे पडताळून पाहताना, हा माझा Realastic पासून Abstrtact पर्यंतचा डोळस प्रवास आहे. यात Realastic Paintings ही शब्दप्रधान गायकीप्रमाणे असून Abstract Paintings म्हणजे त्या क्षणाचं म्हणणं आहे. त्यामूळे ती लोकाभिमूख असतीलच असं नाही...' यावरून त्याच्या चित्रकलेचा रोख कळतो.

कलेचा जन्मच मुळात व्यक्त होण्यातून झालाय. ती लोकांसमोर मांडून टॅलेंट एन्कॅश करण्याची वृत्ती माणसात नंतर आली. जगण्याचा भाग असलेली ही कला, 'नंतर' उपयोजित झाली. कला दाखवण्याऐवजी ती 'जगणं' Pure Art form असायला हवा. हे काहींनाच समजतं तर त्याहून कमीजणांना उमजतं... मिलिंदच्या चित्रांत नक्की काय जाणवतं ते प्रदर्शन पाहूनच कळेल.

प्रदर्शन १तारखेपर्यंत स. ११ते सा. ०८ पर्यंत सर्वांसाठी उघडे राहील.

o नीताई गौरज आर्ट गॅलेरी
२०, रामेश्वर, नीलकंठ हाइट्स, पोखरण रोड नं. २, ठाणे - ०६

- श्रीनिवास रणसुभे

'बोगस' पेंटींग्सचा काळा बाजार

मागच्याच आठवड्यात दिनेश ठक्कर यांच्या वैयक्तिक कलेक्शन मधल्या पोट्रेर्ट्सचं एक चित्रप्रदर्शन म्युझियम आर्ट गॅलेरीत झालं. यात 'प्रदर्शनातली बरीच चित्रं ही खोटी होती' अशी चर्चा झाली, चर्चा आहे आणि ती चालू राहील...

......

मागच्याच आठवड्यात एक चित्रप्रदर्शन म्युझियम आर्ट गॅलेरीत झालं. ते होतं दिनेश ठक्कर यांच्या वैयक्तिक कलेक्शन मधल्या पोट्रेर्ट्सचं. या प्रदर्शनातली बरीच चित्रं ही खोटी होती अशी चर्चा झाली, चर्चा आहे आणि ती चालू राहील...


अशा चित्रांचा फायदा करून घेण्याची पद्धत?
- मोठ्या चित्रकारांची अशी खोटी चित्रं आता काही ४ ते ५ हजारांना करून घ्यायची. (सहीसकटच्या चित्रांच्या किंमती जास्त)
- ती काही वेळा प्रदर्शनात मांडायची.
- त्याच चित्रकाराचं एवढं कलेक्शन असल्याने पुढे Authentication - Certification आपणच करायचं.
- नंतर कालांतराने लिलावात ती काही लाखांना विकून टाकायची.

हे प्रकार अगदी सर्रास होत नसले तरी दिव्याखाली अंधार असतोच...

अशा या 'Fake Art' चे आजपर्यंत बरेच प्रकार घडलेत. त्यातील सर्वांना माहीत असलेले म्हणजे...

o आरांचं पेंटींग तर चांगल्या करकरीत कॅम्लिनच्या कॅनव्हास कॉपी केलेलं होतं (सही सकट). ते नंतर काही तज्ञांच्या आणि अंतिमत: केकू गांधीच्या लक्षात आलं. (तेव्हा केकूंना सर्व नीट लक्षात राहत होतं याची नोंद घ्यावी.) शो नंतर लगेच बंद केला गेला.

o दिल्लीमध्ये रझांचा शो होता. त्यात उद्घाटनाच्या दिवशी रझांचं 'Fake' चित्रं पाहून रझांनाच धक्का बसला होता.

o आता ताओमधल्या शोमध्ये बरवेंचं एक चित्रं खोटं होतं असं म्हणतात. 'ड्रॉईंगमधला फाइननेस बरवेंचा वाटत नाही' अशी प्रतिक्रिया आहे. (खरं खोटं हे करणाऱ्यांना आणि बरवेंनाच माहीत... बरवेंची चित्रं जर अशी कॉपी व्हायला लागली तर करणाऱ्यांचा 'कॅनव्हास कोरा'च म्हणायचा.)

o आताच्या ठक्करांच्या प्रदर्शनात तर सर्रास बऱ्याच कलाकरांची चित्रं कॉपी केली होती असं म्हटलं गेलं. त्यात त्रिंदाद, एम. आर. आचरेकर, व्ही. ए. माळी, धुरंधर, इ. इ. (कदाचित सगळी नसतीलही. पण एक दिसल्यावर इतर चित्रांची शंका नक्कीच घेतली जाते.)

कशावरून...???

आपल्याला सगळ्यांना व्ही. ए. माळी हे मोर आणि मुलगी या चित्रासाठीच नाहीत तर त्यांच्या बऱ्याच स्टीललाईफसाठीदेखील माहीत आहेत. केवळ चित्रकार म्हणूनच नव्हे तर कलेमध्ये वेगवेगळ्या वाटेवर ते कित्येकांना प्रेरणाही ठरलेत. चित्रकाराचं ऑईल कलरमधल्या ब्रशवरून पेस्टलमध्ये काम कसं होत असेल याचा अंदाज करणं जाणकारांना कठीण नाही. एम. आर. आचरेकर त्यांच्या वेळचे एक महत्त्वाचे पोर्ट्रेट पेंटर. १९३५ मध्ये तर त्यावेळचे व्हॉइसरॉय विलिंग्टन यांनी त्यांना लंडनला पाठवलं होतं, पाचव्या किंग जॉर्जच्या सिल्वर ज्युबिली कार्यक्रमासाठी. (या विस्मृती जागवणं गरजेचं वाटतंय...) तर (वयाच्या तिसाव्या वषीर्) १९३७ सालचं त्याचंच चित्रं हे एका नवशिक्या मुलासारखं कसं असू शकतं? त्यांच्या कलाशिक्षणाच्या काळात त्यांनी कितीतरी चुका केल्या असतीलही. पण चुकलेल्या कामांचापण एक दर्जा असतो.

या खोट्या चित्रनिमिर्तीबद्दलच्या काही प्रतिक्रिया...

'ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचं अक्षर, त्याचप्रमाणे चित्रकाराचं ड्रॉइंग हे त्याचं व्यक्तिमत्त्व असतं. एवढ्या मोठ्या चित्रकारांची एवढी poor drwaings असूच शकत नाहीत. ही चित्रं या कलाकारांची असूच शकत नाहीत.'
- दत्तात्रय पाडेकर

'मी दिनेशभाईंना व्यवस्थित ओळखतो. मधल्या काळात भूरट्या चित्रकारांनी अशी चित्रं काढून मोठ्या किंमती मिळवल्यात. पण शो न पाहील्यामुळे मी आताच्या चित्रांबद्दल काहीच बोलू शकत नाही.'
- काशीनाथ साळवे

'असे पुरावे मिळणं एकतर कठीण असतं आणि पुरावे असले तरी कोणतीही यंत्रणा नसल्यामुळे अॅक्शन तरी कशी घेणार.'
- सतीश नाईक

'आम्ही चित्रकारांकडून एकावेळेला एकदम ३०-४० चित्रं विकत घेतो. त्यात वाईट, चांगली, बरी अशी सगळीच चित्रं असतात. शेवटी वाईट असली तरी ती चित्रंच आहेत ना... त्यामुळे आम्हालासुद्धा बरीच चित्रं मिळतात आणि परवडतातसुद्धा. '
- दिनेश ठक्कर

ज्यांना चित्रातलं खरं खोटं कळतं त्यांना कोणतीही अॅक्शन घ्यायची नाहीय. आणि जे काहीतरी करू शकतात, त्यांना यातलं काही कळत नाही, किंवा तशी कोणतीही निदोर्ष यंत्रणा नाही. त्यामुळे जर असं काही झालं असेल तर आपल्याला इथे त्याबद्दल फक्त त्रिवार 'निषेध' नोंदवता येईल. 'निषेध... निषेध... निषेध...' नाहीतर आपण असं म्हणू शकतो की ओल्याबरोबर सुकंही (पाहायला) मिळतं...

- श्रीनिवास रणसुभे

ललित कला अकादमीचं ५१वं राष्ट्रीय प्रदर्शन - गोवा

आत्ताच ललित कला अकादमीचं ५१वं राष्ट्रीय प्रदर्शन गोव्यामध्ये पार पडलं. त्या प्रदर्शनातील क्रिया-प्रक्रियांवर बरोबर गोवा कला अकादमी, ललित कला अकादमी आणि सरकारी यंत्रणेच्या कार्यप्रक्रियेवर टाकलेला प्रकाशझोत....

.....

एकूण २८९७ चित्रकारांच्या ७४४९ प्रवेशिका आणि त्यातून १३२ चित्रं राष्ट्रीय प्रदर्शनात लागली. त्यातून ११ चित्रांना रोख पारितोषिकं (तेही प्रत्येकी ५० हजार रू.) मिळाली. ह्या कार्यक्रमाचा खर्च साधारण ४०-५० लाखांच्या घरात सहज जात असेल. हे आकडे ऐकून बिचकाल, निवड प्रक्रिया कठीण वाटेल, तरी हे काम प्रत्यक्षात आणायला बरीच यंत्रणा काम करत असते. प्रदर्शनापूवीर् शेकडो प्रोफेशनल यासाठी काम करतात. ते सुद्धा केंद सरकारच्या आखत्यारीत. केंद सरकार यासाठी लाखो रूपये खर्च करतं. मग सामान्य माणसाच्या पदरी मंदीचा चटका बसत असला तरीही. कारण एकच...... सरकारला काही पैसा हा कला आणि संस्कृतीसाठी खर्च करावा लागतो. तरच ते सरकार सर्व आलबेल आहे असं सांगू शकतं.

हे आकडे आपण फक्त ललित कलेच्या वाषिर्क प्रदर्शनाचे ऐकलेत. एवढा खर्च करण्यात आक्षेपार्ह काहीच नाही. पण ही प्रक्रीया जेवढ्या चांगल्या पद्धतीने राबवली गेली पाहीजे तशी राबवली जात नाही, याचीच खंत. पाहूया संपूर्ण ललित कला अकादमीच्या या वाषिर्क कला प्रदर्शनामधील महत्त्वाच्या घटकांचा सहभाग.

ललित कला अकादमी आणि अकादमीचे Zonal Members

महाराष्ट्र, गोवा, दिव, दमण या झोन मधून २ उमेदवार निवडून येतात जे केंद सरकारचा कला आणि सांस्कृतिक प्रगतीसाठीचे वेगवेगळे कार्यक्रम कसे राबवावेत, त्यांचं planing कसं असावं हे ठरवतात. हे सदस्य कार्यकारी समिती निवडतात. खऱ्या अर्थाने हा पैसा वापरला जाण्यासाठी आणि हे कार्यक्रम राबवण्यासाठी कार्यकारी समिती जबाबदार असते. त्यांचे निर्णय ते इतर सदस्यांच्या समन्वयाने घेतले जातात. असो.

सध्या या वेस्टर्न झोनमधील सदस्य सुरेंद जगताप यांच्याशी बोलण्यातून ज्या गोष्टी या प्रदर्शनासंबंधी कळल्या त्या अशा...

''या वषीर् महाराष्ट्रातील सर्व २०० कला महाविद्यालयातून या प्रदर्शनासाठी एन्ट्रीज मागवल्या गेल्या, (असं कदाचित पहिल्यांदाच झालं असेल)त्या साधारण १५० च्या आसपास होत्या. गोव्यातून एकूण २६ एन्ट्रीज आल्या. कार्यकारी समितीने कोणत्याही प्रकारे समन्वय न दाखवता स्वत:हूनच प्रदर्शनाचा काळ, ठिकाण, ज्युरी पॅनल ठरवले. समितीला फक्त शेवटी त्या बद्दल 'माहीती' देण्यात आली.''

गोवा कला अकादमी आणि गोमांतकीय कलाकार
गोव्यामध्ये राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शन ही गोवा कला-संस्कृती विभागाला मिळालेली सुर्वणसंधी होती. या संदर्भात गोवा कला अकादमीचे Chairman Secretory पांडूरंग फलदेसाई म्हणतात की, ''गेल्या ५१ वर्षांच्या इतिहासात गोव्याला आणि गोमांतकीयांना मिळालेली ही सुवर्णसंधी आहे. गोव्यातल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रकलेच्या प्रगतीसाठीचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामध्ये एक नवचैतन्य येईल आणि त्याचा परिणाम लगेचच पुढच्या वषीर्पासून दिसून यात शंकाच नाही.''

या संधीची गोवा कला अकादमीने माती केली नसली तरी त्याचं सोनं नक्कीच करता आलं नाही. राष्ट्रीय कला प्रदर्शनासाठी एखाद्या आर्ट गॅलेरीची व्यवस्था कशी असावी, लाइट्स आणि स्पेस कशी अॅरेंज करावी... याचा विचार गोवा कला व सांस्कृतिक विभागाने जरूर करावा. त्यासाठी गोव्यातील अनुभवी कलाकारांचं मार्गदर्शन घ्यावं. पहिल्यांदाच केलेल्या प्रदर्शनाच्या मानाने या सोयी-सुविधा बऱ्या होत्या. पण त्यात अजून खूप सुधारणा पाहीजे.

आता प्रदर्शनाबद्दल...

महाराष्ट्रातून एकूण ९ चित्रकारांची चित्रं निवडली गेली(यापैकी ४ मुंबईची). ज्या मुंबईला चित्रकलेची १५० वर्षांपेक्षा जास्त परंपरा आहे, त्यातसुद्धा अॅब्स्ट्रॅक्ट चित्रांचीसुद्धा इतर भागांपेक्षा जास्त. त्या अॅब्स्ट्रॅक्ट चित्रांचा मागमूसही या प्रदर्शनात दिसला नाही. ही हातचलाखी ज्युरींची आहे की निवडप्रक्रीयेची याबद्दल साशंकता आहे. शेवटी राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शन हे भारतातील समकालीन चित्रकलेच्या चळवळीचा चेहरा आहे. त्याला योग्य तो न्याय मिळायला पाहीजे होता.

अशा कित्येक सुधारणा यापूवीर् सुचवल्या गेल्या असतील आणि पुढे सुचवल्या जातीलही. पण एखाद्या संबंधित अथॉरिटीने याचा विचार करावा की डोळेझाक करून जे चालू आहे ते चालू द्यावं... ते ज्याचं त्यानं ठरवावं. शेवटी एखादी यंत्रणा अस्तित्त्वात नसली तरीही कलेमधली उत्क्रांती काही थांबत नाही. ती नैसगिर्क प्रेरणेने घडत असते. त्यासाठी कुठल्याही सरकारी मानधनाची वास्तवात गरज नसते. मात्र अशी यंत्रणा निर्माण करून शासन आपली कार्यक्षमता, तत्परता सिद्ध करू शकते, एवढंच. मुंबईमध्ये ललित कलेचे एखादं केंद निर्माण होण्यासाठी गेल्या २० वर्षांपासून चाललेल्या प्रयत्नांना सहाय्य करून अशी संधी राज्य सरकारला नक्कीच मिळू शकेल, यात शंका नाही...

- श्रीनिवास रणसुभे

चंद्रमोहन कुलकर्णी

चंद्रमोहन आपल्याला एक illustrator म्हणून माहीती असतील. यांच्या 'चित्रां'चं प्रदर्शन येत्या २४ ते ३० डिसेंबरपर्यंत जहांगिर आर्ट गॅलेरीत चालू होत आहे.

.........

चित्रकलेत बर्याचदा जसं समोर 'दिसतं' तसंच चित्रं काढणं, हेच 'सुंदर चित्र' अशी व्याख्या केली जाते. तसं अॅकेडमीक शिक्षणात शिकवलंसुद्घा जातं... पण पुढे चित्रकार म्हणून जी डेव्हलपमेंट अपेक्षित आहे त्यात दिसण्यापेक्षा 'असलेलं आणि वाटलेलं (Feel झालेलं)' रंगवता आलं पाहीजे.

एका चित्रात आणि illustration मध्ये हा महत्त्वाचा फरक आहे की 'लेखकाचे लेखी विचार वाचकापर्यंत पोहोचवता आले की illustration होतं आणि चित्रकाराच्या भाषेत इतर बंधनं झुगारून देऊन केवळ आपल्या कल्पनेला न्याय देणं जमलं, की चित्रं काढण्याची एक पायरी चढता येते.' दोन्ही गोष्टीत एक सुक्ष्म फरक आहे. पण चंदमोहन कुलकणीर्ंची 'चित्रं' पाहीली की हा फरक काय? ते कळतं..

चंद्रमोहन आपल्याला एक illustrator म्हणून माहीती असतील. पण यांना illustration आणि चित्र यातला फरक स्पष्ट कळलाय हे त्यांच्याशी बोलून आणि त्यांची चित्र पाहून कळतं. यांच्या चित्रांचं प्रदर्शन येत्या २४ पासून ३० डिसेंबरपर्यंत जहांगिर आर्ट गॅलेरीत चालू होत आहे. मुळचं शिक्षण अप्लाइड आर्टमध्ये आणि बराच काळ पुस्तक प्रकाशनासाठी केलेली कामं यातून चंदमोहन यांची सुरुवातीची दृश्यात्मक बांधणी झाली. पण तरीसुद्घा त्यांच्या 'चित्रां'मध्ये चित्रकार म्हणून त्यांचा वावर मुक्त दिसतो.

आताचा 'बँडवाला' हा शो चंदमोहन यांची बँडवाल्यांबरोबरची interaction दर्शवतो. अगदी लहानपणापासून मनात कुठेतरी सुप्तपणे असलेला आणि नंतर 'युनिफॉर्म असुनही अधिकार नाहीत' असा जाणवलेला बँडवाला त्यांना चित्रांतून मांडावासा वाटला. कायम आनंदी सोहळ्यात, मोठमोठ्या कार्यक्रमात रंगीत-संगीत कपड्यात वावरणारे बँडवाले आपल्याला माहीत आहेत. पण 'अंगावर व्यवस्थित न बसणारे आणि उपरे, परके वाटणारे कपडे काढल्यावर त्या मागचा चेहरा खरवडून काढून मागचा माणूस पेंट करायचा प्रयत्न मी केलाय' असं चंदमोहन म्हणतात. वास्तवात बँडवाल्यांबरोबरच्या केवळ गप्पाच नाहीत तर त्यांच्याबरोबर घालवलेला वेळ, त्यांच्याबरोबर फिरणं, त्यांच्या शरिरयष्ठीबरोबरच त्यांच्या लाइफस्टाईलचा अभ्यास चंदमोहन यांनी केला. 'हे सर्व मला आपल्या भाषेतून बोलता येतं का? याचा केलेला प्रयत्न म्हणजेच हे चित्रप्रदर्शन' असं ते म्हणतात.

अॅबस्ट्रॅक्ट आणि रिअॅलिस्टिक या शब्दांचा 'योग्य' अर्थ कळला तरी चित्रांतला मोठा गोंधळ कमी होईल. एखादं आपल्याला जाणीवेच्या पातळीवर भावलेलं visual मोजक्यापद्घतीने रंगवता येणं हेच खर्या अर्थाने अॅबस्ट्रॅक्ट आणि त्याचवेळी खर्या अर्थाने रिअॅलिस्टिक चित्रं असतं. ते चंदमोहन यांना बहुतांशी जमलंय आणि म्हणूनच आताचं त्यांचं प्रदर्शन हे त्यांच्या illustrations चं नसून 'चित्रां'चं आहे असं म्हणावं लागेल. 'अॅबस्ट्रॅक्ट आणि रिअॅलिस्टिक' 'द्बद्यद्यह्वह्यह्लह्मड्डह्लद्बश्ाठ्ठ आणि चित्र' असा गोंधळ असलेल्या चित्रकारांना लवकरच याची स्पष्टता येवो हीच शुभेच्छा.

प्रदर्शन: 'बँडवाला'

जहांगिर आर्ट गॅलेरी, काळा घोडा, फोर्ट, मुंबई - ०१.

- श्रीनिवास रणसुभे

विवेक कुमावत

करियर म्हणून चित्रकलेकडे पाहण्याचा ट्रेंड वाढत असताना, चित्रं जगण्याचा आनंद कळणारे चित्रकार निर्माण होणं गरजेचं झालं आहे. चित्रकार म्हणून जगणं कठीण असं बोलणं सोपं, पण 'चित्रं जगणं' किती आनंददायी त्याबद्दल कोणीच बोलत नाही... आणि तरीसुद्धा अनेक चित्रप्रदर्शनांची नामांकनं मिरवली जातात...

आपापसातली वाद संपवून 'आर्ट स्कुल्स' जेव्हा कामाला लागतील तेव्हा असे 'चित्रकार' तयार होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

असो...

सध्या आमीर् नेव्ही बिल्डींगच्या आर्ट एन्ट्रन्स गॅलरीत विवेक कुमावत या तरूण चित्रकाराचे चित्रप्रदर्शन चालू आहे. त्याच्याशी बोलताना ज्या गोष्टी जाणवल्या त्या इथे मांडल्या. विवेकच्या चित्रांतला 'बैल' हा त्याच्या visual language मधला महत्त्वाचा दुवा आहे. मुळात अप्लाइट आर्टची शैक्षणिक बांधणी, द्बद्यद्यह्वह्यह्लह्मड्डह्लद्बश्ाठ्ठ चा आधीपासूनचा अभ्यास या गोष्टींमुळे त्याच्या चित्रांना एक ठराविक ढब आहेच. 'आपल्याला बैलाचा आकार आवडतो, त्याच्यातली एनजीर् मांडण्यासाठीचा प्रयत्न मी चित्रात करतो' असं विवेक म्हणतो. अलंकारीक आकार, बाकदार वळणं, पोत आणि रंग यामध्ये तो हे व्यक्त करतो.

हे आकारांचे 'प्रकटीकरण' आपल्याला प्रदर्शनात १९ तारखेपर्यंत बघता येईल.

आर्ट एन्ट्रन्स गॅलेरी

आर्मी नेव्ही बिल्डींग, एम. जे. रोड, काला घोडा, मुंबई - ०१

- श्रीनिवास रणसुभे

मुंबई टेरर च्या पिडीतांसाठी चित्रकारांची मदत

मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जहांगिर आर्ट गॅलरीत आजपासून चित्रप्रदर्शन सुरू होत आहे. देशभरातील ४० चित्रकार या प्रदर्शनात सहभागी असून चित्रांच्या विक्रीतील ५० टक्के भाग हा, मुंबईच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिक व पोलीसांसाठी देण्यात येईल. प्रदर्शनाचे उद्घाटन आज संध्याकाळी ०६.०० वा. अॅडीशनल डिजीपी अहमद जावेद यांच्या हस्ते होणार आहे. चित्रप्रदर्शन २३ तारखेपर्यंत चालू राहील.

२६/११ नंतर...

जोपर्यंत दोन माणसांची पोटं भरलेली आहेत तोपर्यंत ते भांडत राहतील. जेव्हा त्या दोघांनासुद्धा खायला काही नसेल तेव्हा...

तेव्हा आपसातले मतभेद विसरून ते त्या परिस्थितीशी झगडतील. एकत्र येतील...

असाच झगडा सर्वत्र चालू असतो... आहे... राहणार...

अगदी सुक्ष्मातसुद्धा आणि अगदी विश्वातसुद्धा. Micro to Macro Level

मन आणि बुद्धीमध्ये झगडा, एक घर आणि दुसऱ्या व्यक्तीमध्ये, कुटुंब आणि कुटुंबामध्ये झगडा, एक घर आणि दुसर्या घरांत झगडा, एका समाजात आणि दुसर्या समाजात, एका गावात आणि दुसर्या गावात, एका राज्यात आणि दुसर्या राज्यांत..... एका देशांत आणि दुसर्या देशात हा झगडा असाच चालू असतो.

जे मानसशास्त्र व्यक्तिचं, तेच राष्ट्राचं, तेच विश्वाचं आणि तेच एका पेशीचं.....

म्हणून देशादेशातील हा वाद, ही भांडणं अशीच चालू राहतील. जोपर्यंत आणखी एखादं मोठं संकट येत नाही तोपर्यंत... म्हणून काय आपण असंच मोठं संकट येण्याची वाट पाहत बसायची? आणि अशीच जर वाट पाहयची असेल तर स्वत:ला ह्यश्ा ष्ड्डद्यद्यद्गस्त्र बुद्धिजीवी माणूस म्हणून घ्यायला लाज वाटते....

..........

राष्ट्रप्रेमाचा पगार फक्त Arm Forces च्या लोकांना मिळतो म्हणून काय त्यांनीच कामं करावीत आणि आपली जबाबदारी काहीच नाही....????

आहे ना... खरंतर जबाबदारी आपलीच आहे...

कारण आज युद्ध, सीमेवर नाही तर सीमेच्या आत होतंय. केवळ आजूबाजूच्या राष्ट्रांना नावं ठेवून आणि त्यांना जबाबदार धरून कितपत यश मिळेल? का फक्त पाकिस्तानातूनच दहशतवादाला पाठींबा आहे? श्रीलंकेला ज्या एलटीटीई कडून सर्वांत जास्त दहशतवाद सहन करावा लागतो त्यांची मूळं भारतात मिळतात... आसाममध्ये बोडो अतिरेकी काय पाकिस्तानातून येतात?... एवढंच काय महाराष्ट्रातल्या आणि झारखंडमधल्या दहशतवादी कारवायांना इकडचा च्भारतीयज् माणूस जबाबदार नाही?

आपण आपली भाषावादी आणि प्रांतवादी भांंडणं करून केवळ आपली शक्ती वाया घालवत आहोत. अशानं केवळ हजारो सर्वसामान्य लोकांचे संसार उध्वस्त होतात... कराचेच असतील तर हजारो संसार उभे करुन दाखवावेत....

सरळ आहे - बापकमाईपेक्षा आपकमाईचे पैसे वापरताना आपण जास्त काळजी घेतो, कारण तेव्हा ती आपली जबाबदारी असते ना... अरे मग घ्या ना जबाबदारी हे सगळं बदलायची.

सिस्टमला नावं ठेवताना सिस्टम बदलायची. पॉलिटीक्सला नावं ठेवताना ते जॉईन करून काही अमुलाग्र बदल घडवायची. Securities आणि Investigation Beuros ला नावं ठेवण्याऐवजी स्वत:ला सिद्ध करून का जॉइन होत नाही आपण IPS आणि NDA ला ? मिडीयामध्ये बदल हवाय म्हणताना आपणसुद्धा मिडीयाचा भाग बनल्यावर तीच तीच दुकानं चालवतो..... का?????

कारण आपल्याला तोंड दिलंय, ते चालवणं सोप्पं आणि खांदा दिलाय जो जबाबदारीचा नांगर ओढायला तर ते नको असतं. केवळ एका मतदानाची जबाबदारीसुद्धा नकोशी वाटते आपल्याला. एवढी दयनीय परिस्थिती

एक विचार

पांडुरंगाच्या नाही, तरी रंगांच्या 'दर्शना'साठी निघालेल्या या वारीत वेगवेगळे वारकरी आपल्याला दिसतील काही मनाच्या समाधानासाठी वारीला जाणारे, तर काही लबाड... यांच्यातला खरा-खोटा, चांगला-वाईट वारकरी आपला आपणच ठरवावा लागतो.

शब्देविन संवादू...

आजच्या आधुनकि भारतीय चित्रकलेत वेगवेगळ्या संकल्पनांचा हातभार आहे. मुख्यत्वे इंग्रजांनी आणलेल्या अॅकेडेमीक आर्टचा आणि युरोपातल्या वेगवेगळ्या इजमचा मूळ भारतीय चित्रकलेवर परिणाम होत होत जी आज आपण पाहतो ती ज्आधुनिकज् भारतीय चित्रकला आहे. ही चित्रकला एखाद्या वडाच्या झाडासारखी वाढत गेली, आपल्याच पारंबीला मुलाधार बनवून... आणि ती अशीच मोठी होत राहणार.

याच वडाचं एक पान म्हणजे आत्मानंद चौहान याचं काम. याचं सायलंट कन्वर्सेशन (स्द्बद्यद्गठ्ठह्ल ष्टश्ाठ्ठ१द्गह्मह्यड्डह्लद्बश्ाठ्ठ) हे चित्रं प्रदर्शन सध्या मुंबईत चालू आहे. याच्या चित्रांत तोच आधुनिक भारतीयपणा स्पष्ट जाणवतो. बडोद्याच्या फॅकल्टी ऑफ फाईन आर्ट मधून शिक्षण घेतलेल्या आत्मानंदचं काम हे मिनिमलीस्टीक (द्वद्बठ्ठद्बद्वड्डद्यद्बह्यह्लद्बष्) आहे असं म्हणायला हरकत नाही. याची चित्रं पाहून एक गोष्ट प्रकर्षाने आठवते ती म्हणजे च्पॉल क्लीज् ची थेअरी... आपल्या आजुबाजुच्या जगातील दृश्य परिणाम हेच चित्ररुपी वृक्षाचे बीज असते.... आत्मानंदच्या चित्रांतसुद्धा आजुबाजुच्या परिसरातील वेगवेगळे आकार, रंग अगदी स्पष्टपणे दिसतात आणि तो त्यांची रचना कॅनव्हासच्या अवकाशात सहज करतो. इथेच चालू होतो आकार आणि अवकाशाचा खेळ. कधी स्पष्ट तर कधी अस्पष्टपणे. त्याचा खरा आनंद चित्रं पाहूनच घेता येईल.

ही चित्रं आपल्याला ७ डिसेंबर पर्यंत एनसीपीएच्या गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मध्ये पाहायला मिळतील.

- एनसीपीए गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट

पहिला माळा, एनसीपीए मार्ग, नरीमन पॉइंट, मुंबई - ४०००२१

- कला वारी

रानातली फुलं जेव्हा रंगामध्ये हरवतात....

अवतीभवती नाना प्रकारची झाडं, फूलं, वेली, प्राणी, पक्षी आणि खूप काही... अशा निसर्गानं भारलेल्या त्या जंगलात किलबिलणाऱ्या मुलांचा तो आश्रम... 'त्या' दिवशी मात्र त्या आश्रमात जरा जास्तच चिवचिवाट सूरू होता... रानातच वाढलेल्या त्या मुलांना रंगांची नवी दुनिया सापडली होती... काळा, निळा, पिवळा, नारंगी... अशा हाताला येईल त्या रंगात ती रानातली फुलं स्वत:च रेखाटलेल्या नव्या जगात हरवून गेली होती.

मुंबईपासून अगदी काही तासाच्या अंतरावर असलेलं येऊरचं जंगल... त्या जंगलात विवेकानंद अनाथाश्रम गेली कित्येक वर्षे डोईवरचं छप्पर हरवलेल्या त्या मुलांसाठी मायेचं घर बांधून उभं आहे. या आश्रमात चित्रकलेचा वर्कशॉप घ्यायचं असं दहा चित्रकार मित्र ठरवतात आणि हाताशी काहीही नसताना हा वर्कशॉप यशस्वी करुन दाखवतात. त्यांच्या त्या यशानं त्यांना जे समाधान मिळतं त्यापेक्षा खूप काही त्या चिमण्यापाखरांच्या चेहऱ्यावर उमटलेलं असतं.

हे चित्रकार कोणी फारमोठी नाव असलेले चित्रकार नव्हेत. चित्रकलेचे शिक्षण झाल्यानंतर आपापल्या कामामध्ये गुंतलेले तुमच्याआमच्यासारखीच ही माणसं. पण आपली ही चित्रकला फक्त क्लायंटच्या ऑर्डर्स पूर्ण करण्यापलीकडे काहीच साध्य करत नाही याची खंत त्यांना कुठेतरी सतावत होती. मग त्यातील एकाला ठाण्यातील येउरमधील विवेकानंद आश्रमाचा पत्ता सापडतो आणि ठरते, की आपल्या रंगांनी या मुलांच्या चेहऱ्यावर हसू रंगवू.

अनाथाश्रमातील त्या मुलांसाठी वर्कशॉप घ्यायचं ठरतं खरं पण त्यासाठी लागणाऱ्या खर्चाचं काय? रंग, कागद अशा साधनांसाठी कॅम्लिनची मदत मिळते आणि मोठ्ठा प्रश्न सुटतो. बाकीच्या खर्चासाठी आपल्याच खिशात हात घालायला हे मित्र तयार होतात. कारण त्या वर्कशॉपमधून त्यांना ना बक्षीस हवं असतं ना मानधन... चित्रकलेचं वेड त्या मुलांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांची ती धडपड होती... आणि त्या ७६ मुलांनी त्या धडपडीचे अक्षरश: सोने केले.

आकाशात ढगांनी आकार करावेत आणि संध्येने त्यामध्ये रंग भरावेत अशा सहजतेने ती मुले चित्रांमध्ये गुतंली होती. कागद, मग तो लहान असो वा मोठा... एखादा मोठा चित्रकार कामामध्ये स्वातंत्र्याबरोबर थोडसं डिसिप्लीन सांभाळतो तसं ती मुलंही सांभाळत होती. त्याची स्टाइलही कोणत्याही बंधनांनी बांधली नसल्याने अगदी नैसगिर्क पद्धतीने कागदावर उमटत होती. त्यातील काही झाडाखाली तर काही अगदी बेंचखाली बसून रंगाचे पोत रेखाटत होती.

त्यांना ना परीक्षा द्यायची होती ना विषय ठरला होता. तुम्हाला जे वाटतं ते काढा हा सल्ला त्यांना व्यक्त होण्यासाठी पुरेसा होता. अशा वेळी बरीच मुलं कार्टून वगैरे काढण्याचा प्रयत्न करतात. पण दोन दिवसांच्या या वर्कशॉपमध्ये या मुलांच्या एकाही चित्रांमध्ये एकही कार्टून नव्हते. होता तो त्यांच्या सभोवती असणाऱ्या निसर्गाचं रंगरुप. त्यात हत्ती होते, पक्षी होते आणि रंगामध्ये दडलेले निसर्गाचे ढंग होते.

या सर्व मुलांपैकी कोणी कधी पुढे मोठा चित्रकार म्हणून जगाला माहित होवो न होवो, पण त्यांच्यातला चित्रकार कायम जिवंत राहील.

-श्रीनिवास रणसुभे