पुण्यामध्ये १० तारखेपासून रवि परांजपेंच्या पंच्याहत्तरीनिमित्त एक चित्रप्रदर्शन व गप्पांचा कार्यक्रम बालगंधर्वमध्ये साजरा होतोय. त्यानिमित्ताने रिप्रेझेंटेशनल व नॉनरिप्रेझेंटेशनल चित्र यावरच्या वादावर टाकलेला हा प्रकाशझोत...
एखाद्या स्पर्शातून, गंधातून, दृष्यातून, आवाजातून एखादा विचार सुचतो आणि तो विचार कलाकार आपल्या कलाकृतीतून मांडतो. हे सुत्र सर्वच कलांमध्ये सारखंच आहे. अगदी पाचही ललितकला या एका धाग्याने घट्ट बांधलेल्या आहेत. मात्र आपले विचार मांडण्याची माध्यमे जेव्हा बदलली तेव्हा त्या सर्वांमध्ये फरक झाला.
चित्रकलेत यातही पुढे रिप्रेझंेटेशनल आणि नॉनरिप्रेझंेटेशनल अशी एक महत्त्वाची जातकुळी निर्माण झाली. हा महत्त्वाचा फरक आला तो दोन्ही प्रकारच्या चित्रांच्या मांडणीतल्या चित्रकांरांच्या अट्टहासामुळे... रिप्रेझंेटेशनल चित्रकारांचा हट्ट असा, की त्यांच्या चित्रातील एलिमंेटस हे दर्शकांना कळतील असेच (प्रतिकात्मक) असतील. त्यामुळे ही चित्रकला फार लोकाभिमुख झाली.(?) तर नॉनरिप्रेझंेटेशनल चित्रपरंपरेतील चित्रकारांनी चित्रातून जास्तीतजास्त 'अंतर्मुख' होण्याचा प्रयत्न कायम ठेवला. (जगणं आणि चित्र काढणं हे वेगळं नसतंच.) पण ज्यांना हे समजलंच नाही, असे पासरीने खोटे अमूर्त चित्रकार निर्माण झाले. तर या दोन्ही दगडांवर पाय ठेऊ पाहणारे, 'मधले' 'माकेर्ट' च्या दृष्टीने चित्र काढणारे चोर चित्रकार निर्माण झाले... सेलिब्रीटीज निर्माण झाले. आता मात्र डेकोरशन आर्ट व केवल-चित्र असं शीतयुद्ध कायम चालूच आहे. हा झाला चित्रकलेतला इतिहास आणि वर्तमान.
ही सर्व पार्श्वभूमी देण्याचं कारण म्हणजे पुण्यामध्ये रवि परांजपंेच्या पंच्याहत्तरीनिमित्त आपल्या सर्वांच्या भेटीसाठी एक चित्रप्रदर्शन व गप्पांचा कार्यक्रम बालगंधर्वमध्ये साजरा होतोय. इलस्ट्रेशन व आकीर्टेक्टससाठी लागणारी मांडणीचित्र, अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी 'रवि परांजपे शैली' असा ठसा उमटवला. पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ ते चित्रकला क्षेत्रात कार्यरत आहेत. 'शिखरे रंग रेषांची' आणि 'ब्रश मायलेज' या पुस्तकांमुळेही ते आपल्याला माहीत आहेत. रवि परांजपे अमृतमहोत्सव समितीद्वारे होणा-या ह्या तीन दिवसांच्या कार्यक्रमात रवि परांजपंेशी ड्रॉइंग, इलस्ट्रेशन, सौंदर्यदृष्टी, डिझाइन बेस कल्चर अशा विषयांवर संवाद साधला जाणार आहे. १९९१ मध्ये पुण्यात झालेल्या त्यांच्या व एस एम पंडीत यांच्या प्रदर्शनाने विक्रमी प्रतिसाद मिळवला होता. अगदी लांबच्या लांब रांगा लावून लोकांनी हे प्रदर्शन पाहीलं होतं.
या प्रदर्शनाच्या निमित्ताने रवि परांजपंेशी बोलताना, भारतीय परंपरेत अलंकरण हा रोजच्या दैनंदिन जीवनाचा भाग होता. तो आता खूपच कमी होत चालला असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. चित्रनिमिर्तीच्या परंपरेत निरागसतेला खूपच महत्त्व असतं. पण 'रिप्रेझंेटेशनल चित्रनिमितीर्त निरागसतेपेक्षा संस्कार अधिक महत्त्वाचे आहेत. एखाद्या लहान मुलाने काढलेल्या चित्राला संस्काराचं कांेदण असेल तर ते अधिक चांगलं असेल.' असेही परांजपे म्हणाले.
या कार्यक्रमाच्या कॅटलॉगध्ये आपले विचार मांडताना परांजपंेनी नॉनरिप्रेझंेटेशनल चित्रशैलीविरोधात तलवारच उपसली आहे. ते आपल्या लेखात अशा चित्रांना अपरंपरावादी, कुरूप चित्रे म्हणतात. तसंच त्यांच्या या चित्रप्रदर्शनाबद्दल ते म्हणतात की हे प्रदर्शन म्हणजे या काळच्या चित्रांमध्ये ओअॅसिससारखे आहे. याच अमूर्त चित्रांबद्दल विचार मांडताना ते म्हणतात की, 'राग साथीला न घेता ख्याल गायल्यासारखा वाटतो, अशी ही चित्रकला आहे. अर्थात ही अमूर्त चित्रशैली पूर्ण टाकाऊ आहे असं नाही.' असं म्हणताना सॅम फ्रांसीस, रामकुमार यांच्या चित्रांबद्दलचा आदर त्यांनी बोलून दाखवला.
परंपरेतला हा वाद असाच चालू राहील. एका लेखाने, एका प्रदर्शनाने तो मिटणार नाही. किंवा यातून खूप काही लोकशिक्षण होणार नाही. सरते शेवटी एवढंच म्हणावंस वाटतं...
रचना (Design) व कला (Art) यात बराच फरक आहे. नाहीतर हे वेगळे शब्दसुद्धा निर्माण झाले नसते. यातला नेमका अर्थ कळण्यासाठी वेगळं विचारमंथन होण्याची गरज आहे. ज्यांना याचा नेमका फरक कळला ते 'चित्र जगण्याकडे' वळले. बाकीच्यांनी या गतेर्तून बाहेर यावं की येऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
।। सत्यचित्रार्पणमस्तु।।
- श्रीनिवास रणसुभे
No comments:
Post a Comment